Friday, December 9, 2011

वेगळ्या विदर्भ राज्याचे समर्थन करणारयांनाच मतदान करा- किशोर तिवारी यांचे आवाहन -तरुण भारत

वेगळ्या विदर्भ राज्याचे समर्थन करणारयांनाच मतदान करा- किशोर तिवारी
यांचे आवाहन -तरुण भारत

यवतमाळ, ९ डिसेंबर
पश्चिम महाराष्ट्राच्या राज्यकत्र्यांनी, विदर्भावर अन्यायाचा कहरच केला, असून विदर्भात होत असलेल्या, शेतकरयांच्या आत्महत्यांना आघाडी, सरकारमधील काँग्रेस व राष्ट्रवादी, काँग्रेसचे नेतेच जबाबदार असून, विदर्भाचा ५० वर्षांचा अनुशेष भरून, काढण्यासाठी शेतकरयांच्या, आत्महत्या, आदिवासींचे कुपोषण व, बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी आता, वेगळा विदर्भ राज्य, होणे हा एकमेव, तोडगा आहे. येत्या, ११ तारखेला होत, असलेल्या नगर, परिषद निवडणुकीत जे उमेदवार व पक्ष, वेगळ्या विदर्भाच्या मागणीला समर्थन, देतील त्याच उमेदवारांना मतदान करा, असे कळकळीचे आवाहन विदर्भ, जनआंदोलन समितीचे नेते किशोर, तिवारी यांनी केले., भ्रष्टाचारविरोधी आघाडीचे घाटंजी, येथील अपक्ष उमेदवार मधुकर निस्ताने, यांच्या प्रचारसभेत बोलताना तिवारी, यांनी हे आवाहन केले त्यावेळी शेकडो, येथील नागरिकांनी या मागणीला पाठिबा, दिला.
विदर्भ सर्व जगात भारताच्या, शेतकरयांच्या आत्महत्येची राजधानी, म्हणून कुप्रसिद्ध झाला आहे. एकेकाळी, या वरहाडाला सोन्याची खाण म्हणण्यात, येत होती ती आज पश्चिम महाराष्ट्राच्या, नेत्यांनी शेतकरयाच्या आत्महत्येच्या, स्मशानभूमित परावर्तीत केली आहे., अशा परिस्थितीमध्ये विदर्भाच्या दबंग, नेत्यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या नेतृत्वाची, कास धरून, त्यांच्या कुबड्या घेऊन, सत्तेच्या पायरया चढून संपत्ती गोळा, करणे सोडावे व विदर्भाच्या, स्वातंत्र्याच्या या लढाईमध्ये नवीन युवा, नेतृत्वाला समोर करून, त्यांच्या पाठीशी, तन मन धन लावून उभे राहावे, असा, सल्लाही किशोर तिवारी यांनी दिला. ज्या, पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांनी या, महाराष्ट्राला लुटून २ लाख कोटींच्यावर, कर्ज या महाराष्ट्रावर केले असून, महामहीम, राज्यपालांच्या, आदेशानंतरही, विदर्भाला, घटनात्मक, हक्काचा विकासाचा निधी सतत १०, वर्षांपासून देण्यात येत नाही. विदर्भाच्या, विकासाच्या चितेवर अभ्यास, करण्यासाठी समित्यांवर समित्या, बसविल्या जातात. अशीच एक केळकर, समिती सध्या विदर्भात फिरत असून सर्व, नेत्यांनी व अभ्यासकांनी या अभ्यास, समितीसमोर फक्त वेगळ्या विदर्भाची, मागणी रेटावी, अशी विनंतीही किशोर, तिवारी यांनी यावेळी केली.
विदर्भाचा, मागासलेपणा व औद्योगिकीकरणामध्ये, झालेली पीछेहाट व शेतकरी, आदिवासींचे होत असलेले शोषण हे, पश्चिम महाराष्ट्राच्या दलाली करणारया, पोटभरू नेत्यांची विदर्भाला देण असून, या सर्व नेत्यांना त्यांची जागा, दाखवण्याची संधी नप निवडणुकीच्या, निमित्ताने आली आहे., वेगळ्या विदर्भ राज्याचे समर्थन, करणारयांनाच मतदान करा, किशोर तिवारी, यांचे आवाहन
केले आहे.

No comments: