Sunday, June 29, 2014

मोदी सरकार बाबत शेतकरी नेते विजय जावंधिया यांचाशेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप हि जल्दबाजीची व न पचणारी टीका -किशोर तिवारी



मोदी सरकार बाबत शेतकरी  नेते विजय जावंधिया यांचाशेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप  हि जल्दबाजीची व न पचणारी टीका -किशोर तिवारी  
विदर्भ  - २९जुन २०१४

निवडणुकीपूर्वीच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी कृषिमूल्य आयोगाच्या ज्या शिफारशी मान्य  केल्या त्यांची केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी २६ जून रोजी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन २०१४-१५च्या खरीप हंगामासाठी शेतमालाच्या हमी भावाची केलीली  घोषणा  आहे,हि सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, अशी  शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी  घेतलेली भुमिका थोडी  जल्दबाजीची  व  विदर्भाच्या  शेतकऱ्यांना न पचणारी आहे  ,अशी प्रतिक्रिया किशोर तिवारी यांनी  व्यक्त केली आहे. 
'एका महिन्यातच मुल व्हावे ' अशी  आशा  करणे थोडी जल्दबाजी व घाईच होईल कारण शेतकऱ्यांना खर्चावर ५० टक्के नफा हिशेबात घेऊन हमीभाव  द्यावे ही शेतकरी आयोगाची शिफारश मागील संपुआ सरकारने १० वर्ष  पुर्ण केली नाही व आता नव्या कृषिमूल्य आयोगाची रचना होण्यापुर्वीच मोदी सरकारने डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारने जाहीर केलेलाच हमी भाव जाहीर करून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे असा आरोप करणे थोडसे जुने पुर्वग्रह समोर येत असा भासच शेतकऱ्यांना होत असुन मोदींना काम करण्यासाठी वेळ द्यावा ही जनतेची रास्त अपेक्षा चळवळीची नेत्याकडून अपेषित असल्याने आपण  प्रतिक्रिया देत असल्याचा खुलासाही तिवारी यांनी जोडला आहे . 
शेतकरी नेते विजय जावंधिया  हे  सध्या संपुर्ण भारतामध्ये  कोरडवाहू शेतकऱ्यांच्या  समस्या घेऊन  मागील ४० वर्षापासुन सतत लढत आहेत व त्यांचा अविरत पाठपुराव्याने शेतकऱ्यांना  भरपुर फायदा झाला आहे .  त्यांची भुमिका जेंव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणुकीच्या जाहीर सभेतून शेतकऱ्यांना खर्चावर ५० टक्के नफा हिशेबात घेऊन भाव जाहीर करण्याचे वचन दिले आहे व  त्याप्रमाणे धानाचा हमी भाव १ हजार ६८४ रुपये व कापसाचा हमी भाव ५ हजार १२० रुपये प्रती क्विंटल जाहीर करणे मोदी सरकारचे कर्तव्य आहे अशा वेळी सत्तेत आल्यावर मोदी सरकारने धानाच्या हमी भावात ५० रुपये प्रती क्विंटल, कापसाच्या हमी भावात ५० रुपये क्विंटलची वाढ केल्याचे जाहीर करणे चुकीचे आहे ,हि रास्तच आहे  व आम्ही हा अन्याय  महायुतीच्या नेत्यासमोर  ठेवला असुन  शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचे जाहीर वचन देले आहे  अशा  वेळी  ज्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत होते त्यावर नव्याने सुरवात होणे काळाची गरज आहे व हीच अपेक्षा शेतकऱ्यांची  आमच्या कडून आहे करीता नव्या सरकारला संपुर्ण  मागणीपत्रच सादर करण्यात आले आहे ,अशी माहीती किशोर तिवारी यांनी दिली . 
पंतप्रधान नरेंद्र मोदी  विदर्भाच्या कोरडवाहु शेतकऱ्यांच्या आत्महत्या  रोखण्यासाठी कर्जमुक्ती ,कापसाची व सोयाबीनची  भाववाढ , सिंचन सुविधा यावर आपल्या अर्थ संकल्पात आराखडा देतील व भरीव  निधी देतील असा विश्वास किशोर तिवारी यांनी  व्यक्त केला 
आहे. 

No comments: