Tuesday, October 28, 2014

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विदर्भाच्या शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील :भ्रष्टाचार व ठेकेदार मुक्त सरकार द्या

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विदर्भाच्या शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील :भ्रष्टाचार व ठेकेदार मुक्त सरकार द्या 
विदर्भ -२९ ऑक्टोबर २०१४
भाजप विधिमंडळ पक्षाने विदर्भाचे लाडके विदर्भवादी नेते आमदार देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून केलेल्या  निवडीचे विदर्भाच्या शेतकरी व आदिवासींच्या हक्कासाठी लढणाऱ्या विदर्भ जनांदोलन समितीने स्वागत केले असुन आता शेतकऱ्यांचे व आदिवासींचे प्रश्न तसेच वेगळ्या विदर्भ राज्य निर्मितीचा मार्ग मोकळा झाला असुन आता पश्चिम महाराष्ट्राच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याची संधी आली आहे असा आशावाद विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी व्यक्त केला आहे . 
विदर्भाचे लाडके विदर्भवादी नेते आमदार देवेंद्र फडणवीस हे विदर्भाच्या चळवळीचे अग्रगामी नेते असून सर्व विदर्भावाद्यानी त्यांच्या पाठीशी उभे रहावे विदर्भाचे मागासलेपण व झालेला अन्याय आता दुर करण्याची संधी आली आहे ,विदर्भाला उद्योग ,शेतकऱ्यांना कामाचे दाम ,बेरोजगारांना काम ,आदिवास्याना जगण्याच्या अधिकार  देवेंद्र फडणवीस देतील असा विस्वास तिवारी यांनी व्यक्त केला आहे . 

आज महाराष्ट्राला भ्रष्टाचार व ठेकेदार मुक्त सरकार  गरज आहे व देवेंद्र फडणवीस हे ठेकेदारांशी हित वा पार्टनरशिप असणारे नेते नाहीत , सरकारला मधले पोटभरू नेते मांडवणी करून राजकारण करणाऱ्या नेत्यांना घरी पाठवून गरिबांना देवेंद्र न्याय देईल असा जनतेला विस्वास आहे यावर्षी विदर्भात  पावसाने  २५ ऑगस्टलाच हजेरी लावल्याने व नंतर १७  सप्टेंबर नंतर गायब झाल्यानंतर दुबार-तिबार  पेरणी करून थोडा दम धरलेल्या शेतकऱ्यांना भारनियमनाने पार बरबाद केले असून ऐन दिवाळीत शेतकरी व शेतमजुर उपासमारीला तोंड देत असुन दिवाळीसाठी फाटकेतर सोडा सध्या खेड्यात फुटाणे घेण्यासाठीही दमडी नसून या दशकातील हि सर्वात मोठी  नापिकी असुन  अधिकारीमात्र वातानुकुल कक्षात बसून विक्रमी उत्पादनाचे दावे करीत आहेत यावर्षी पहिले गारपीट नंतर पावसाने दगा दिल्याने विदर्भात २९ ऑक्टोबर पर्यंत ९१२ च्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून जर सरकारने तात्काळ कापसाच्या भावाचा प्रश्न व नापिकीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी व मदत घोषित करावी अशी मागणी विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी   देवेंद्र फडणवीस यांना केली आहे .  


या वर्षी संपूर्ण विदर्भात ३० लाख हेक्टर मध्ये सोयाबीन आणि कापूस पिकाने दगा दिल्याने शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्याचा सोयाबीन वर जर  खर्च अडीच हजार असताना उत्पन्न मात्र दोन हजार रुपयांचे होत असल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. येरव्ही सोयाबीनचे ३० किलो बियाणे पेरणी केल्यानंतर आठ ते दहा क्विंटल होणारे उत्पन्न आता केवळ ८० किलोवर आले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. यंदा सुरूवातीलाच पावसाने दडी मारली. त्यानंतर सुरळीत पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे शेतकर्‍यांनी पेरणी केली मात्र पुन्हा पावसाने दगा दिल्यानंतर अनेकांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. उशिरा पेरणी झाल्याने आणि वातावरणातील बदलाने उत्पन्नात कमालीची घट झाली. एरव्ही३० किलो सोयाबीन बियाण्याची लागवण केली की त्यापासून आठ ते दहा क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न व्हायचे. मात्र यावर्षी ३० किलोला ८० किलो अशी सोयाबीनची उतारी आहे. त्यातच सोयाबीन काढणीचा खर्च प्रती बॅग १ हजार ५००रुपये झाला आहे. मशीन आणि ट्रॅक्टरचा खर्च एक हजार रुपये असा २ हजार ५०० रुपये खर्च आहे. याव्यतिरिक्त लागवण आणि मजूरीचा खर्च वेगळा असे असताना काढणीचाच खर्च २ हजार ५०० रुपये उत्पन्न मात्र २ हजार रुपये अशी परिस्थिती तालुक्यात सर्वदूर आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. अनेकांनी सोयाबीनची ही उतारी पाहून त्यामध्ये जनावरे सोडणेच पसंत केले आहे मात्र अधिकारी सरकारला अंधारात ठेवत आहेत ,असा आरोप तिवारी यांनी केला आहे . 
दिवाळी हा सण सर्वांसाठीच महत्वाचा. तीन दिवसांवर हा सण येऊन ठेपला असताना पैशाची तजवीज करण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड सुरू आहे. नातेवाईक, आप्तेष्ट, सावकारांचे कर्जासाठी उंबरठे झिजविले जात आहे. असे असताना प्रशासनाकडून या गंभीर परिस्थितीची कुठलीही दखल घेतल्या गेली नाही. वास्तविक सोयाबीन पिकाचा आतापर्यंत सर्वे व्हायला हवा होता. तसेच शेतकर्‍यांना फुल ना फुलाची पाकळी अशी आर्थिक मदत करून तात्काळ दिलासा द्यावा  अशी मागणी तिवारी यांनी  केली आहे 
विदर्भाचे नगदी पिक  कपाशीचे उत्पन्न पाण्याअभावी जाऊ नये म्हणून तालुक्यातील शेतकर्‍यांनी कर्ज काढून सिंचनाच्या सुविधा उपलब्ध केल्या. मात्र भारनियमनाच्या फटक्याने त्या कुचकामी ठरत असून, २० लाख हेक्टर मध्ये कापसाची पेरणी केलेले शेतकरी प्रचंड संकटात सापडले आहे. कपाशीचे उत्पन आता एकरी एक ते दोन किंटळचा होणार नाही त्यातच कापसाचा बाजार भाव हमीभावापेक्षा कमी झाला आहे सरकारने तात्काळ कापुस उत्पादक   शेतकऱ्यांची मदत करावी अशी मागणी तिवारी यांनी पुन्हा केली आहे .

निसर्गाच्या लहरीपणासोबतच वीज वितरणाचा मनमानी कारभारही शेतकऱ्यांच्या संकटात भर घालत आहे. सध्या कृषी फिडरवर २२ तासाचे भारनियमन होत आहे. केवळ दोन तास वीज उपलब्ध होत आहे. अशा स्थितीत काही शेतकरी रात्री बे रात्री जाऊन ओलिताचा प्रयत्न करीत आहे. मात्र तेही शक्य होत नाही. वीज वितरणपुढे शेतकऱ्यांनी आता हात टेकले आहे,मात्र शेतकऱ्यांचा . कोणीच वाली दिसत नाही अशा अडचणीत शेतकर्याना फक्त देवच वाचवू शकतो कारण सर्वच नेते शेतकऱ्यांच्या कबरीवर बसून सत्ता काबीज करण्याचा प्रयन्त करीत आहेत याला आता शेतकऱ्यांनीच उत्तर देणे गरजेचे आहे मात्र शेतकरी जाती राजकारणात आंधळा झाल्याची खंत तिवारी यांनी व्यक्त केली .

No comments: