Wednesday, January 28, 2015

यवतमाळ जिल्यात एकाच दिवशी चार शेतकऱ्यांनी केल्या :युतीसरकारने पिक कर्जमाफी व हमीभाववाढीच्या आश्वासनाला पानेपुसल्याने आले शेतकरी आत्महत्यांचे पिक

यवतमाळ जिल्यात एकाच दिवशी चार शेतकऱ्यांनी केल्या :युतीसरकारने  पिक कर्जमाफी व हमीभाववाढीच्या आश्वासनाला पानेपुसल्याने आले शेतकरी आत्महत्यांचे पिक 

दिनांक २९ जाने २०१५
एकट्या यवतमाळ जिल्यात आज चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत ,येथील वसंतराव नाईक वैदकीय महाविद्यालयात कळंब तालुक्यातील देवनाला येथील तुलसीराम राठोड व सोनेगाव येथील देवराव  भागवत तर घाटंजी तालुक्यातील बोदडीचे बन्सी राठोड तर केळापूर तालुक्यातील मोहदा येथील प्रकाशभाऊ कुतरमारे यांचे शव  उत्तरतपासणी आणण्यात आले होते व या शेतकऱ्यांनी विष घेऊन आत्महत्या केल्याची नोंद सरकारने केली आहे . सध्या दुष्काळग्रस्त शेतकरी तुरीचे व कापसाचे भाव हमीभावापेक्षा कमी  झाल्याने त्रस्त असुन सरकारी खरेदी होत नसल्याने व्यापारी मंदीचा हवाला देत लुटत आहेत ,विदर्भात  या महिन्यात आणखी ५८  दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी कर्जबाजारी व सतत नापिकीला तसेच भाजप -शिवसेनेच्या युती सरकारने लोकसभा व विधानसभेत सातबारा कोरा करणे व  लागवड खर्ज अधिक ५०% नफा असा हमीभाव देण्याचे आश्वासन पुर्ण करणे तिजोरी खाली असल्यामुळे आत्महत्या झाल्या असुन ,सरकारच्या उदासीन धोरणामुळे आत्महत्या मागील सहा  महिन्यात वाढल्या असुन मस्तवाल अधिकारी शेतकऱ्यांच्या अडचणीची माहिती सरकारला देत नसल्यामुळे सरकार मदती तटपुंजी देण्यात येत असुन त्यातही ला विलंब करीत असल्याचा आरोप विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केला .
सरकारने घोषीत केलेली मदतही मिळत नसल्याच्या आरोप शेतकरी नेते शेखर जोशी यांनी केला असुन माझा शेतसारा बारमाही सिंचनाचा घेतात मात्र मदतीसाठी कोरडवाहूचे निकय लावण्यात येत असुन  हे सरकार  मागील सरकारपेक्षा जास्त शेतकरी विरोधी आहेत असा आरोपही त्यांनी केला. पालकमंत्री संजय राठोड यांनी आपल्या शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी सरकारला जागे करावे अशी विनंती त्यांनी केली आहे.  

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नापिकीचा मोबदला देता येत नाही ,कर्जमाफीमुळे  शेतकरी आत्महत्या व समस्यांचा तोडगा सिंचन नसून मातीचा ओलावा असा जावईशोध अधिकाऱ्यांनी लावून नवीन सरकारला पटवून दिल्याने सरकारने  शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे , जर युती सरकारने दुष्काळग्रस्त शेतकर्याना प्रति हेक्टरी २५ हजार रुपये सरसकट अनुदान , संपूर्ण शेतकर्‍यांना कर्जमाफी व नव्याने पीककर्ज देण्याची योजना लागू केली नाही वं , सर्व उपासमारीला तोंड देत असलेल्या गावातील शेतकरी व शेतमजुरांना अंत्योदय योजना तत्काळ लागू केली नाही, सर्व शेतकर्‍यांना रोजगार हमी योजनेमधून १०० दिवस प्रति एकरी दिले नाही तसेच  सर्व दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना व शेतमजुरांना मोफत आरोग्य सुविधा, शिक्षण सुविधा व मुलीच्या लग्नासाठी अनुदान तात्काळ दिले नाही तर आज दिवसाला पाच शेतकरी आत्महत्या करीत आहेत तर येत्या काळात नौकरशाही गुलामीतील  नाकर्त्या सरकारला दररोज कमीत कमी १० निरापराध शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोजाव्या लागतील ,असा ईशारा किशोर तिवारी दिला  आहे 
 कापसाला व सोयाबीनला  मागील तीन  वर्षापासुन देण्यात येत असलेला हमीभाव अन्यायकारक असुन यामुळेच कोरडवाहु शेतकरी आत्महत्या करीत अशी ओरड करुन आम्ही लागवड खर्ज अधिक ५०% नफा असा हमीभाव देण्याचे आश्वासन देऊन केंद्राची व राज्याची सत्ता काबीज करणारे भाजप सेनेचे नेते कापसाला कमीत कमी रु सहा हजार तर सोयाबीनला रु पाच हजार प्रती किं .  भाव दयावा अशी मागणी करून निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन देणाऱ्या तेलंगाना ,आंध्र व महाराष्ट्र पैकी तेलंगाना पाठोपाठ आता राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी राज्यातील शेतकऱ्यांकरिता कर्जमाफी योजनेची घोषणा केली आहे. मात्र कोरडवाहु दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीककर्ज माफी म्हणजे आत्महत्यांना आमंत्रण अशी टोकाची शेतकरी विरोधी भुमिका महाराष्ट्राच्या युती सरकारने घेतली ही तात्काळ बदलावी असाही रेटा तिवारी यांनी लावला आहे .  
लोकसभा निवडणुकीत महायुतीने राज्यातील कोरडवाहु शेतकऱ्यांचे संपूर्ण पीककर्ज माफ करण्याचे व लागवड खर्ज अधिक ५०% नफा असा हमीभाव देण्याचे आश्वासन देऊन केंद्राची व राज्याची सत्ता काबीज केली आहे.यावर्षी तेलंगाना ,आंध्र व महाराष्ट्र मध्ये अभूतपूर्व दुष्काळ पडला व शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्र सारख्या वाढल्यानंतर  राज्यातील शेतकरी गेल्या दहा वर्षांपासून कठीण परिस्थितीतून जात आहेत, या जाणिवेतून आणि शेतकऱ्यांना पीक घेण्यासाठी पुन्हा पत निर्माण व्हावी, या भूमिकेतून पहिले तेलंगाना व आता आंध्र सरकारने संपूर्ण पीककर्ज घोषित केली आहे मात्र केंद्र सरकारच्या बँका या कर्जमाफीला विरोध करीत असुन  केंद्राचे रालोआ सरकार बँकानी  कोणतीही माफी देऊ नये अशा आदेशामुळे शेतकरी नवीन पिककर्ज घेण्यापासून वंचित रहात आहेत या शेतकरीविरोधी  पत पूरवठा धोरणाची चिन्हे महाराष्ट्रात दिसत असुन युती सरकारचे कोरा सातबारा करण्याचे आश्वासन आता भाजप पाठोपाठ शिवसेनाही विसरणार व आम्ही गंमत गंमत करत होतो असेच उत्तर  येत्या अधिवेशनात देणार हे आजच निश्चित झाले आहे ,असा आरोप तिवारी यांनी केला आहे .

No comments: