Monday, September 25, 2017

अंतोदय अन्न सुरक्षा योजना बंद होणार नाही -किशोर तिवारी

अंतोदय अन्न सुरक्षा योजना बंद होणार नाही -किशोर तिवारी 
दिनांक-२५ सप्टेंबर
महाराष्ट्र सरकारने अन्न सुरक्षा योजनांतर्गत नागरी पुरवडा विभागामार्फत सर्व गरीबांना देण्यात येणारे अन्न खुल्या बाजारात काळा बाजार करून विकणाऱ्या माफियांचा बंदोबस्त करण्याच्या मोहीमेचा एक भाग म्हणून एकाच कुटुंबात दोन दोन तीन तीन अंत्योदयच्या शिधा वाटप पत्रिका तयार करून अन्नाची उचल करणाऱ्या स्वत दुकानदारांनी अशी शिधा वाटप पत्रिका गावपातळी रद्द करावी व ज्या गरीबातल्या गरीब कुटूंबाना अंत्योदय योजना लागु करावी ह्या प्रधान सचिव महेश पाठक यांच्या सर्व जिल्हा पुरवडा अधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशावर हा  अंत्योदयचे अन्न खुल्या बाजारात काळा बाजार करून विकणाऱ्या माफियां दुकानदाराने सरकार महाराष्ट्रात अंत्योदय योजनाच गुंडाळत अशा बातम्या माध्यमांना दिल्यानंतर हा गंभीर मुद्दा कै वसंतराव नाईक शेती स्वा मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याना विचारणा केल्यानंतर ही योजना भारत सरकारने पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी काळात सुरू करण्यात आली असुन महाराष्ट्र सरकारला बंद करण्याचा
प्रश्नच उपस्थित होत नाही वा आपण ही योजना विस्तारीत करीत असल्याची माहीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहीती शेतकरी मिशन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिली .
मागील तीन वर्षात शेतकरी मिशनने  १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त पश्चिम विदर्भ व  मराठवाड्यात ७० लाखावर सात बारा असणाऱ्या शेतकरी कुटुंबाना सरसकट २ रु किलो गहु व ३ रु किलो तांदुळ देणारी अन्न सुरक्षा योजना लागु केल्यानंतर आता ग्रामीण पश्चिम  विदर्भ व  मराठवाड्यात १०० टक्के अन्न सुरक्षा देण्यात आली असुन खेड्यातील एकही कुटुंब अन्नापासुन वंचित राहणार नाही याची हमी देण्यात आली आहे त्याच वेळेस गावातील श्रीमंत मंडळी ,राजकीय नेते ,नौकरदार ,शिधा वाटप दुकानदार यांनी एकाच कुटुंबात दोन दोन तीन तीन अंत्योदयच्या शिधा वाटप पत्रिका तयार करून अन्नाची उचल करणाऱ्या व खुल्या बाजारात विकण्याचा  गोरखधंदा राजरोसपणे चालु असल्याच्या प्रचंड तक्रारी आल्यानंतर महाराष्ट्र सरकारने अन्न सुरक्षा योजनांतर्गत नागरी पुरवडा विभागामार्फत सर्व गरीबांना देण्यात येणारे अन्न खुल्या बाजारात काळा बाजार करून विकणाऱ्या माफियांचा बंदोबस्त करण्याच्या मोहीमेचा एक भाग म्हणून एकाच कुटुंबात दोन दोन तीन तीन अंत्योदयच्या शिधा वाटप पत्रिका तयार करून अन्नाची उचल करणाऱ्या स्वत दुकानदारांनी अशी शिधा वाटप पत्रिका गावपातळी रद्द करावी व ज्या गरीबातल्या गरीब कुटूंबाना अंत्योदय योजना लागु करावी असा आदेश दिल्यानंतर आपला गोरखधंदा बंद होणार असल्याने महाराष्ट्रात अंत्योदय अन्न सुरक्षा योजनां बंद होत असल्याच्या खोट्या अफवा पसरविण्यात येत असुन फक्त बोगस अन्न विकणाऱ्याचा बंदोबस्त करण्यासाठीच ही मोहीम असुन एकही गरीब ज्याला एका कुटूंबात एक अंत्योदयाचे रेशन कार्ड असेल व  सदयस एक वा दोन असतील तरी  त्यांची  अन्न सुरक्षा योजना  रद्द होणार नाही अशी ग्वाही तिवारी यांनी दिली . 








No comments: